सातारा – कराड तालुक्यातील टेंभू येथील उपसा सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटना व प्रकल्पबाधितांनी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले.
टेंभू प्रकल्पाचे काम 20 वर्षांपूर्वी पूर्ण झाल्याने अनेक कोरडवाहू शेतकर्यांच्या जमिनीला पाणी मिळाले आहे. मात्र, या प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकर्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. यासाठी अनेक वेळा आंदोलने होऊनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही.
शेतकर्यांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळाले नसल्याने, केंद्र व राज्य सरकारकडून मिळणार्या आरक्षणाचा लाभ त्यांना अजूनही झालेला नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आले. विनायक जाधव, आनंदा भंडलकर, विजयसिंह वारुंगे, सुशील लावंड, विक्रम लावंड, संघदीप पवार उपस्थित होते.