रांजणगाव गणपती -सरपंच सेवा संघाच्या वतीने यंदा रत्नागिरी गणपतीपुळे येथे सरपंच महोत्सव साजरा केला जाणार आहे. याची सविस्तर माहिती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना देण्यात आली. राज्यातील किमान पाच हजार सरपंच उपस्थित राहणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल महोदयांनी करावे, अशी विनंती सरपंच शिष्टमंडळाने केली. सरपंचांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व बाबासाहेब पावसे यांनी केले. यावेळी वंदना पोटे, रोहीत पवार, रविंद्र पावसे, पृथ्वीराज पाटील, मैनाद्दीन शेख, निलेश पावसे, यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात सरपंच संघटन मजबूत करण्यासाठी सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर कार्यरत आहे. सरपचांना येणाऱ्या अडचणी, विविध शासकीय योजना, सर्व सामान्य माणूसाला सेवा देण्यासाठी सरपंच अहोरात्र मेहनत घेत आहे. या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आदर्शगावे निर्माण करण्यासाठी सुरुवात केली आहे.
याचा भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील अहेरी, आर्वी सह काही गावांमध्ये प्रत्यक्षात कामे सुरू झाली आहे सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यभर संघटनात्मक संरचना सुरू आहे तसेच राज्यातील सर्व तालुक्यात लवकरच कार्यकारिणी जाहीर करू. लवकरच महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना मागदर्शन चर्चा सत्र मेळावा सरपंच महोत्सव आयोजित करण्याचा सरपंच सेवा संघाचा मानस आहे, अशी माहिती रविंद्र पावसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.