कोपरगाव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसने अल्प कालावधीमध्ये शैक्षणिक दर्जा व गुणवत्तेमुळे राज्यातच नव्हे देशाचं जगभरात या संस्थेने वेगळा ठसा उमटवला आहे. संजीवनी इंजीनियरिंग मध्ये हे शिक्षण घेतलेल्या मुलांना जगात मागणी वाढणार आहे कॅम्पस इंटरव्ह्यू साठी मुलांना कंपनीमध्ये रांग लावण्यापेक्षा जगातील अनेक नामवंत कंपन्या संजीवनीची मुले मिळवण्यासाठी कंपन्यांच्या रांगा लागतील इतके चांगल्या दर्जाचे शिक्षण येथे दिले जात आहे याचे मला समाधान वाटते असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी व्यक्त केले.
इंजिनियरींग’च्या सर्व शाखांच्या पदवीधर विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान कार्यक्रम अर्थात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११३वा पदवीधर दीक्षांत समारंभ कोपरगाव येथील संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेच्या प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, पुणे परिवहन महामंडळाच्या चेअरमन तसेच व्यवस्थापक संचालीका नयना गुंडे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे , सुमित कोल्हे, प्राचार्य संजय आरोटे, प्राचार्य समाधान दहिकर, विजय नायडू ,नरेश अग्रवाल या मान्यवरांच्या हस्ते स्नातकांना पदवीप्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातून ध्वज प्रभातफेरी काढून विद्यापीठ सामुदायिक गीत म्हणून महाविद्यालयातील तीनशे विद्यार्थी-विद्यार्थिनींना इंजिनिअरिंगच्या पदवीचे प्रदान केले. यावेळी डॉ. गुंडे बोलताना पुढे म्हणाले कोपरगावच्या मातीत वेगळा सुगंध व ताकत आहे. ज्यांनी संजीवनीच्या मातीत राहून शिक्षण घेतले त्यांच्या कीर्तीचा सुगंध जगभर पसरणार. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हे परिवाराच्या नव्या पिढीने सर्वसामान्य लोकांच्या पिढीचे शिक्षणाच्या माध्यमातून कल्याण करीत आहेत असेही ते म्हणाले.
आपल्या बीजभाषणात नयना गुंडे म्हणाल्या. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.प्रदूषणाला आळा घालून इंधनमुक्त सार्वजनीक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत आहे त्याला प्रतिसाद म्हणून राज्यातल्या राज्यातल्या या सहा महानगरपालिका मध्ये प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिका एक वर्षापासून शहरात इलेक्ट्रिक बसचा वापर करून दीडपट उत्पन्न वाढविले आहे . नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या इलेक्ट्रिक बस पाहण्यासाठी देशभरातील तज्ञ व इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी येत आहेत त्यामुळे अल्प काळामध्ये संजीवनी ऑटोनॉमस महाविद्यालय झाल्याने संजीवनी इन्स्टिट्यूटसमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भावी काळात इलेक्ट्रिक वाहनाच्या उलाढालीत सुवर्ण संधी आहे. अध्यक्षीय मनोगतात नितीन कोल्हे यांनी पदवीग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.