नवी दिल्ली – जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन समितीने (वाडा) डोपिंगच्या आरोपातून दोषमुक्त केलेल्या भारताच्या वेटलिफ्टर संजीता चानू हिने यंदा अर्जुन पुरस्कार मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
2016 साली या पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी मला नाकारण्यात आले. त्यानंतर पुढील वर्षी पुन्हा एकदा माझ्या नावावर काट मारण्यात आली. त्यावेळी माझ्यावर डोपिंगचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांतून मला दोषमुक्त ठरवले गेले आहे. मी एप्रिलमध्येच या पुरस्कारासाठी अर्ज केला होता, असा विश्वासही संजीताने व्यक्त केला आहे.