मुंबई – शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत. अजूनही अनेक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी गुवाहाटीमध्ये 42 आमदारांसह गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले.
तर दुसरीकडे शिवसेना आमदारांचा आग्रह असेल तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीतून बाहेरही पडण्याची आमची तयारी आहे. फक्त आमदारांनी मुंबईत यावं आणि इथे येऊन चर्चा करावी. पुढील 24 तासात आमदारांनी मुंबईत यावं, असं आवाहन मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना केलं होतं.
त्यानंतर काही वेळातच आता संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिंदे गटातील आमदारांना चर्चेसाठी मुंबईत येण्याच आवाहन केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,…
चर्चेतून मार्ग निघू शकतो.
चर्चा होऊ शकते.
घरचे दरवाजे उघडे आहेत..
का उगाच वण वण भटकताय?
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!
जय महाराष्ट्र.
घरचे दरवाजे उघडे आहेत..
का उगाच वण वण भटकताय?
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!
जय महाराष्ट्र.
दरम्यान, शिवसेनेच्या अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत बंडात सहभाग घेतला आहे. यामुळे राज्यातील मविआ सरकरा अस्थिर होण्याची शक्यता आहे, या सगळ्या अस्थिरच्या काळात संजय राऊत मात्र सगळं व्यवस्थित होऊ शकतं असा आशावाद व्यक्त करताना दिसत आहेत.