मुंबई – द काश्मीर फाईल्स या सिनेमावरुन सध्या देशभर वेगवेगळी मतं व्यक्त होताना दिसत आहेत. तसेच त्यावरून राजकारणदेखील होताना पाहायला मिळत आहे. यातच काल माध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरबाबत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि आजचे उद्धव ठाकरे यांचे वर्तन यात खूप मोठे अंतर. सत्य पुढे येत असेल, तर काही लोकांना मिर्ची का लागते काश्मीर फाईल्सच्या माध्यमातून सत्य समोर आले, मी निर्मात्यांचे अभिनंदन करतो! अस म्हणत शिवसेनेवर टीका केली.
तर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकरांशी बोलतांना काश्मीर फाईल्सवर बोलताना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली. संजय राऊत म्हणाले,’ रस्त्यावर उतरून नौटंकी कशाला, चौकशीला सामोरे जा; राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यावर रडताय का? आघाडीच्या लोकांच्या चौकशा सुरू होतात, अटकेची कारवाई होते तेव्हा भाजपच्या लोकांना गुदगुल्या होतात. त्यावेळी भाजपचे लोक रस्त्यावर उतरून लेझीम खेळायचे बाकी असतात. आता मात्र, त्यांच्याविरोधात राज्यातील पोलिसांनी चौकशी सुरू केली तर आरडाओरड सुरू केला. राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत, हे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील पोलीस खोटे गुन्हे दाखल करणार नाहीत. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारे राज्य आहे. पुराव्यांशिवाय कारवाई करणार नाहीत.
राज्यपालांकडून ही अपेक्षा नाही. ते राजकारण करत आहेत, इतिहासात कळ्या अक्षरांनी यांची नोंद होईल, ज्या पक्षातून राज्यपाल आले त्या पक्षाच्या दबावामुळे ते राजकारण करत आहेत. ज्या पातळीवर त्यांच्या पक्षाने आणि राज्यपालांनी हा संघर्ष नेऊन ठेवला आहे इतिहासात त्याची काळ्या अक्षराने नोंद होईल. घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं हे आणिबाणीची आठवण करून देणारं आहे.
काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत, काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या.’