मुंबई – भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावरुन सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रसाद लाड म्हणाले होते की,’ नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजींच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे.’
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर
बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..)
शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे.
बाटगयांना हे कसे समजणार?— Sanjay Raut (@rautsanjay61) August 1, 2021
ते पुढे म्हणाले की,”तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटतं की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते दे.’
त्यांच्या या विधानावर पत्रकरांशी बोलताना संजय राऊत यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ते म्हणाले,’या विषयावर आमचे स्थानिक शाखाप्रमुख प्रतिक्रिया देतील”, असं म्हणून त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलं.
राऊत यांनी या संदर्भात एक ट्वीट देखील केलं आहे. ‘महाराष्ट्रात तातडीनं नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फूटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है…) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटग्यांना हे कसं समजणार?,’ असा सवालही राऊत यांनी केला
दरम्यान,भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावरुन सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सध्या त्यांनी केलेल्या या विधानावर शिवसेनेचे कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री त्यामुळे संतप्त झाले असून आपला संताप व्यक्त करत आहेत. यातच उदय सामंत यांनीही प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.