मुंबई – एखादी नवरी घर सोडताना कसं सोंग करते तसं यांनी वर्षा बंगला सोडताना सोंग केलं. आम्ही जेव्हा त्यांना भेटायला जायचो. तेव्हा मास्क लावून आम्हाला भेटायचे. आता सरकार गेलं, मास्कही गेले. अन् खुर्चीही गेली आणि कोरोनाही गेला. सत्ता असतांना ठाकरे हे केवळ टीव्हीवर दिसायचे. टीव्ही बंद केला तर ठाकरेही दिसत नसायचे. अशी जहरी टीका औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केली आहे.
सध्या सोशलवर त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ते पुढे म्हणाले,’उद्धव ठाकरे अडीच वर्षे ते कोणालाही दिसले नाहीत. आपण त्यांना फक्त टीव्हीमध्ये पाहात होतो. आम्हालाही टीव्ही सुरू केल्यानंतरच उद्धव ठाकरे दिसायचे. टीव्ही बंद केला की ते गायब व्हायचे. करोनाकाळात एवढे संकट आलेले होते. मात्र उद्धव ठाकरे एकाही जिल्ह्यात गेले नाहीत. आदित्य ठाकरे यांनीही एखाद्या ठिकाणाला भेट दिली नाही. मात्र आता त्यांना सगळीकडे जाण्यासाठी वेळ आहे.’ असेही संदीपान भुमरे म्हणाले आहे.