मुंबई – भारतीय चित्रपटसृष्टीला 34 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खानने शुक्रवारी जाहीर केले की त्याच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाचे नाव ‘किसी का भाई… किसी की जान’ असे ठेवण्यात आले आहे. सलमानने ‘बीवी हो तो ऐसी’ मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून त्याने आपली ओळख निर्माण केली होती.
सलमानने साकारलेल्या प्रेम, समीर, राधे आणि चुलबुल पांडे यांसारख्या अनेक व्यक्तिरेखा आजही खूप फेमस आहेत. किसी का भाई ‘किसी की जान’ हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. सलमानने याबाबतचा आपला लूक रिव्हील करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
यावेळी सलमानने आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. ३४ वर्षांच्या कारकिर्दीबद्दल अनेक चाहत्यांनी देखील सलमानला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.