मुबई : भारत पारतंत्र्यात असल्यापासून देशातील नागरिक तिरंग्या खाली एकत्र येऊ लागले. आजही तिरंग्यासमोर सर्वजन नतमस्तक होतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भगव्या झेंड्याला विशेष महत्व असून देशाच्या राजकारणा भगव्या झेंड्याच्या भवताली फिरताना दिसून येते. हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या राजकीय पक्षात भगव्याला विशेष महत्व दिले जात असल्याने आता राष्ट्रवादीने ही भगव्या झेंड्याचा आधार घेण्याचे ठरविले आहे.
धर्मनिरपेक्ष अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात यापुढे दोन झेंडे असणार आहेत. पक्षाचा एक आणि दुसरा भगवा झेंडा असावा अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे यापुढे सभेत ठेवण्याच्या सूनचा पवार यांनी केल्या. त्यामुळे राष्ट्रवादीलाही भगव्या झेंड्याची भुरळ पडल्याचे चित्र आहे.
देशात आदिलशाही, अकबर, टिपू यांची राज्यं होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भोसल्यांचे राज्य कधी कुणी म्हटलं होतं का ? त्यांच्या राज्यात रयतेचं राज्य म्हटलं गेलं होतं. यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये ‘शिवरायांचा भगवा’ आणि राष्ट्रवादीचा झेंडा असे दोन झेंडे राहणार, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.