मुंबई – मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसनंतर आता एनआयएकडून मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला असताना संभाव्य अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या वाझे यांना दिलासा मिळू शकलेला नाही. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
आखिरकार सचिन वाजे को #NIA ने गिरफ्तार कर ही दिया, क्या अब सचिन वाजे को बचाने का कुकर्म करने वाली #Shivsena की सरकार देश की माफी मांगते हुए सचिन वाजे की #Narco टेस्ट करेगी ? हमारी मांग है सचिन वाजेकी नार्को टेस्ट की जाय। ताकि पत्ता चले महाराष्ट्र सरकार उसे बचाना क्यों चाहती थी? pic.twitter.com/HO4qWaC0sT
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) March 14, 2021
यातच मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणीत सुरुवातीपासूनच सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झालेलं दिसून येत आहे.
भाजप नेते राम कदम यांनी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी ट्विट करत केली आहे.
काय म्हणाले राम कदम
‘अखेर सचिन सचिन वाझे याला अटक झाली आहे. त्यामुळे सचिन वाझेला वाचवू पाहणारी शिवसेना सरकार देशाची माफी मागणार ? अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी” असं कदम यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले,’नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.