युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत भोपाळच्या दोन बहिणी आज (गुरुवार) घरी पोहोचल्या. मिली तिवारी आणि मुस्कान तिवारी या दोघी बहिणी 2017 मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेल्या होत्या. मिली आणि मुस्कानने सांगितले की, युक्रेनमध्ये भारताचा तिरंगा घेऊन कोणी बाहेर पडले तर या वातावरणातही कोणी काही बोलत नाही.
सुरक्षाची हमी बनला तिरंगा –
दोन्ही बहिणींनी सांगितले की, केवळ भारतीय विद्यार्थीच नाही तर इतर देशांतील विद्यार्थीही हातात तिरंगा घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचत आहेत. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, तुर्कस्तान आणि नायजेरियातील त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना इजा होऊ नये म्हणून हातात तिरंगा घेऊन प्रवास केला. मिलीने सांगितले की, तिच्या परदेशी मित्रांचे म्हणणे आहे की त्यांच्या हातात तिरंगा पाहून आम्हाला सुखरूप बाहेर सोडण्यात आले.
दोन्ही बहिणींनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या शहरातून 5 दिवसांचा प्रवास करून रोमानियाच्या सुरक्षित सीमेवर पोहोचले आणि यादरम्यान त्या दोन दिवस निर्वासित छावणीतही राहिल्या. मात्र रोमानियामध्ये पोहोचल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने विद्यार्थी घरी पोहोचेपर्यंत त्यांची पूर्ण काळजी घेतली. दोघी बहिणींच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमधून पोलंड, हंगेरी आणि रोमानियाला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःहून पैसे खर्च करावे लागतात. त्यानंतर, रोमानिया विमानतळ ते दिल्ली विमानतळ आणि त्यानंतर घरापर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण खर्च सरकारने उचलला आहे.