रेवती खूप आनंदी होती. इतक्या आनंदी तिला कुणी केव्हाच पाहिले नव्हते. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते. आनंद, सुख, समाधान चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. कारण दहा ते बारा वर्षांनंतर हे सुख तिच्या ओंजळीत आले होते. कारण आज तिला मातृत्व प्राप्त झाले होते. एक छान गोंडस कन्यारत्नाला तिने जन्म दिला होता. त्यामुळे जगातील सगळे सुख तिच्या पायाशी लोळण घेत आहेत. तिच्यासारखा आनंदी या जगात कोणीच नाही असे तिला वाटत होते. अतिशय गोड आणि लाघवी मुलगी हसरी आणि सतत आनंदी राहावे, इतरांनासुद्धा आनंदी ठेवणारी, तिने तिच्या स्वभावाने सगळ्यांना आपलंसं केले होते. मोठेच काय पण बालचमू पण तिच्यासोबत अगदी आनंद आणि मोकळे असायचे.
रेवतीच्या मागे तिचा आई-बाबा, भाऊ, बहीण असा परिवार होता. अत्यंत छान आणि सुखी असे कुटुंब होते. वृंदा तिची मोठी बहीण. तिचे लग्न झाले होते आणि मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या एक वर्षानंतर तिच्या मधल्या भावाचे लग्न झाले. वहिनी घरात आली म्हणून रेवती अत्यंत खूश होती. रेवती म्हणून सगळ्यांची लाडकी होती. अतिशय हुशार व्यक्तिमत्त्व होते. तिचा छान उंच, सडपातळ बांधा, सावळ्या रंगाची, छोटे पण दाट कुरूळ्या केसांची मोहक रेवती अमोघला खूपच आवडली. तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. अमोघचा पत्रिका बनवण्याचा व्यवसाय होता आणि सोबतच एक मिनी मार्केट होते. जमिनी मार्केटमध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या सगळ्या गोष्टी तिथे मिळत असत. एक-दोन तास दुकानावर सामान आणायला गेली होती. तेव्हा अमोघ हळूच चोरून चोरून तिच्याकडे पाहत असेल कारण त्यावेळी वडील दुकानावर असायचे.
अमोघला रेवतीचा मोकळेपणाचा स्वभाव खूप आवडला. हळूहळू अमोघ आणि रेवती दोघे बोलू लागले. दोघांमध्ये छान मैत्री झाली नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मग दोघांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. फोनवर बोलणे, मेसेज करणे, दोघांना एकमेकांच्या सवयी, स्वभाव समजू लागले. एकमेकांचे स्वभाव आवडू लागले. अमोघने त्याच्या घरामध्ये रेवती आणि त्याच्या नात्याबद्दल सगळी कल्पना दिली होती. त्यामुळे घरच्यांकडून कोणताही विरोध नव्हता. कारण त्या सगळ्यांना रेवतीचा स्वभाव आवडत असे. परंतु रेवतीने तिच्या घरात हे काही सांगितले होते. त्यामुळे ती अत्यंत अनभिज्ञ होती. कारण रेवतीच्या बाबांचा स्वभाव अत्यंत कडक होता. म्हणून ती बाबांना घाबरायची पण तेवढीच ती बाबांची लाडकी होती. त्यांनी हळुवार प्रेमाने समजून सांगितले. बाबांना अमोघच्या आणि तिच्या नात्याबद्दल मग काय बाबा पण तयार झाले.
अमोघ हा अत्यंत शांत स्वभावाचा आणि मितभाषी होता. म्हणजेच रेवतीच्या अगदी उलट स्वभाव होता. रेवती ही खूप बडबडी होती. आणि अमोघ अतिशय शांत स्वभावाचा होता. तर रेवतीच्या घरातल्यांची त्याने मने जिंकली आणि दोघांच्याही घरातून लग्नाचा विरोध न येता होकारच आला. मोठ्या थाटामाटा दोघांचे लग्न झाले. सगळे आनंदी होते. दोघांचा संसार अगदी खूप छान चालला होता.
आता फक्त दोघांच्या लग्नाला दोन वर्षे होत आले. घरच्यांना आतुरता लागली की केव्हा लहान बाळाचा आवाज घरात घुमेल. परंतु अशी चांगली बातमी काय कोणाच्याच खाली पडेना. दिवस असेच चालले होते. हळूहळू अमोघ आणि रेवतीमध्ये दुरावा येऊ लागला. अमोघचे आई-वडील व नातेवाईक येता-जाता रेवतीला घालून पाडून बोलत. सतत तिला टोमणे मारत, कारण लग्नाला दहा वर्षे झाली होती तरी रेवतीला अजूनही मूल बाळ झाले नव्हते. दोघांचे रिपोर्ट नॉर्मल येत पण तरी असा प्रॉब्लेम का? असा प्रश्न नेहमी रेवतीला पडत असे. परंतु कालांतराने दोघांमध्ये अबोला निर्माण झाला.
रेवती आईकडे राहिला गेली. काही दिवसांनी रेवतीच्या घरी घटस्फोटाची नोटीस आली. रेवती कोलमडून पडली. मन अगदी सुन्न झाले. खूप दिवस झाले रेवती अतिशय दुःखी होती. रेवतीच्या आई वडिलांनी तिला एक अट घातली. तुझं दुसरे लग्न करणार असल्यास तरच घटस्फोट घ्यायचा नाहीतर घटस्फोट घ्यायचा नाही. रेवतीने खूप विचार केला व त्यानंतर तिने अखेर घटस्फोटाचा विचार केला. काही दिवसांतच दोघे विभक्त झाले रेवतीला ही गोष्ट खूप मनाला लागली, ती खूप रडली.
घटस्फोटानंतर सहा महिन्याने तिचे लग्न झाले. तिचा भावी आयुष्यातला नवरा अतिशय चांगला माणूस होता. तिच्यावर प्रेम करणारा, तिची काळजी घेणारा तिला समजून घेणारा होता. संसार चांगला चालला होता. काही महिन्यांतच तिला एक गोड बातमी कळली ज्या गोष्टीची ती दहा-बारा वर्षे वाट पाहत होती, ती गोष्ट तिला आज मिळाली. आणि ती म्हणजे ती गरोदर होती. ती खूप आनंदी पण होती, दुःखी पण होती, काही करावे तिला काही समजत नव्हते पण तिला एक प्रश्न पडला होता की सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, तरीही मी गरोदर राहिलेले मलाच लांचन लावले गेले. मला वांझोटी हा किताब दिला गेला, मग आता मी गरोदर कशी राहिली? नक्की प्रॉब्लेम माझ्यामध्ये होता की अमोघमध्ये रेवती पुन्हा विचारात घडून गेली पण कालांतराने पुन्हा भानावर आली.
तिने मनाशी एकच ठरवले की आताचे हे एक सुंदर क्षण छान अनुभवाचे, आनंदाने जगायचे रेवती अमोघ समोर अमोघ सोबत ज्या डॉक्टरांकडे जायची ते डॉक्टर एक दिवस रेवतीला मॉलमध्ये भेटले. त्यावेळी ते म्हणाले की, मी खूप आनंदी आहे, कारण तुला गरोदर पाहून खरच मी खूप आनंदी आहे. मला तू माझ्या मुलीसारखी आहे, कारण प्रॉब्लेम तुझ्यात नसून अमोघमध्ये होता आणि तरी तू गरोदर राहिली याचा मला खूप आनंद झाला आहे. मग कुठे आहे तो खूश आहे ना या गोष्टीबद्दल डॉक्टरांनी रेवतीला विचारले. डॉक्टर अमोघला सगळीकडे पाहत होते. म्हणजे ते त्याला शोधत होते की आम्ही कुठे असतो. त्यावर रेवतीने सगळी हकीकत डॉक्टरांना सांगितली. तेव्हा डॉक्टर बोलले काही हरकत नाही बेटा आता हे क्षण आनंदाने जग आणि बाळाला जन्म दे आणि त्याच्याकडे छान लक्ष दे, नऊ महिने पूर्ण झाले आणि रेवतीने का गोंडस मुलीला जन्म दिला.
बाळ आणि आई दोघे सुखरूप रेवती खूप आनंदात होती. पण एक खंत सतत तिच्या मनात होती. अमोघ खोटं का बोलला, खरंच का एखाद्या स्त्रीला जर मूल झाले नाही, तर ती वाईट असते. ती परिपूर्ण नसते खरंच आहे का? जेव्हा एखादी स्त्री जर मुलाला जन्म देत नसेल तर ती परिपूर्ण नसते पण जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला लांचन लावते. समजून घेत नाही ती गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे. कारण जी स्त्री दुसऱ्या स्त्रीला लांचन लावते तेव्हा ती हे का नाही समजून घेत की ती सुद्धा एक स्वतः स्त्री आहे.
– मयुरी कदम-शिंदे