वाघळवाडी – वीर धरणातून आज पहाटे ६.३० च्या सुमारास नीरा नदीमधे ९४ हजार २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सदरचा विसर्ग सकाळी 8 वाजता १ लाख क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे नीरा नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये निंबुत, मुरूम, होळ, लाटे येथील ब्रिटीशकालीन बंधारे, जुने पूल पाण्याखाली गेले आहेत.
संततधार पावसामुळे वीर धरणामधील पाण्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सदरचा विसर्ग १० लाख ५००० ते ११०००० क्युसेक करण्यात आला आहे. या कारणामुळे (ता.बारामती) येथील निंबूत गावातील स्मशानभूमीमध्ये नीरा नदीचे पाणी शिरले आहे. नीरा नदीवरील फलटणकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे. होळ येथील जलदेवी म्हणून प्रसिद्ध ढगाई देवी मंदिर नीरा नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये गाला आहे. नीरा नदीकाठी असलेल्या धोकादायक पुलांच्या ठिकाणी वडगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.