अहमदाबाद – ऋषभ पंतला सलामीला पाठवल्यावरून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मावर टीका होत असली तरीही त्याने पंतला पाठिंबाच दिला आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत संघाकडे असलेल्या सर्व खेळाडूंना त्यांच्या नेहमीच्या क्रमांकापेक्षा अन्य क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवणे हीच आमची योजना आहे. पुढील काळात भारतीय संघ सातत्याने मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे. या स्थितीत एखादा प्रमुख खेळाडू जायबंदी झाला तर त्याच्या जागी त्याच क्षमतेने फलंदाजी करणारा फलंदाज संघाकडे तयार असावा हाच हेतू आहे, असे रोहितने सांगितले.
पंतच नव्हे तर येत्या काळात अन्य काही फलंदाजांच्या फलंदाजीच्या क्रमात बदल केले जातील. त्यातून जे अपयशी होतील त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल. मात्र, त्यांचा आत्मविश्वास खच्ची होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली जाईल, असेही रोहितने सांगितले आहे.