मुंबई – वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड व दीपक हुडा यांचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी बीसीसीआयने जाहीर केलेल्या या संघातून दुखापतीमुळे लोकेश राहुलला तर करोनातून अद्याप पूर्ण बरा झाला नसल्याने अक्सर पटेल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात येत्या 16, 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा.