अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त केला असून ते म्हणाले,’अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल, पण सावंत कधीच भिकारी होणार नाहीत. अगदी असंच सध्या सुरू आहे. म्हणून तर ते स्वतःचाच विचार करत आहेत. रुग्ण मृतांबाबत मला काहीच विचारू नका.’ असंही आरोग्य मंत्री म्हणत आहेत. मग जबाबदारी कुणाची? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
तत्पूर्वी, खुद्द तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी हा मुद्दा आपल्या खात्याशी संबंधित नसल्याचे सांगतानाच संपूर्ण मंत्रिमंडळाला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तानाजी सावंत म्हणाले, “ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तसेच नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये जवळपास 100 रुग्ण दगावले आहेत. तथापि, या घटना माझ्या आरोग्य खात्याअंतर्गत येत नसून वैद्यकीय शिक्षण खात्याअंतर्गत येतात
तसेच, या घटना केवळ एका विशिष्ट खात्याशी संबंधित नसून राज्य मंत्रिमंडळाची ही संयुक्त जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी मांडलेल्या या मतामुळे उपस्थित अधिकारीच नव्हे, तर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच एस. पी. सिंग देखील अवाक झाले. यावरून आता रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.