Riteish Deshmukh । लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुख कुटूंबासह अनेक काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात रितेश देशमुख वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
वडिलांची आठवण सांगताना रितेशला भावना अनावर झाल्या आणि तो मंचावरच रडू लागला. यावेळी भाऊ अमित देशमुखने यांनी रितेशला सावरले. यावेळी रितेश यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या आठवणी ताज्या केल्या. ( Riteish Deshmukh )
‘साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा लातूरला आले, तेव्हा मांजरा साखर कारखान्यावर त्यांचा सत्कारचा कार्यक्रम होता. तेव्हा साहेब देवळात नाही गेले. पहिल्यांदा स्टेजवर आहे दादांच्या पायावर डोकं टेकवलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि भाषण सुरु केलं… भाषण सुरु केल्यानंतर साहेब गहिवरले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
एवढी लोकं ऐकत होती, सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. काय पुढे करायचं कोणाला माहिती नव्हतं कारण साहेब बोलत नव्हते. त्यावेळे काका उठले त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले ‘कम ऑन यू कॅन डू इट…’ एका भावाने दुसऱ्या भावासोबत कसं वागलं पाहिजे याचं उदाहण येथेच आहे…’ असं रितेश यावेळी म्हणाले.
‘साहेबांनी आणि दिलीप राव साहेबांनी भाऊ म्हणून एकमेकांना कसं जपलं… आपल्या भावाला आपण कशी साथ देऊ शकतो हिच भावना… साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली… साहेबांची उणीव कायम भासते. पण काका कायम सोबत उभे राहिले. गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे. ( Riteish Deshmukh )
काकांना बऱ्याच वेळा बोलता आलं नाही. पण आता सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे याचं उदाहरण आज या स्टेजवर आहे.’ असं देखील रितेश देशमुख यावेळी म्हणाले. ( Riteish Deshmukh )