Rahul Gandhi । उत्तरप्रदेशातील भाजपचे सरकार म्हणजे बेरोजगारांसाठी डबल दणका सरकार ठरले आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. एक्स वरील हिंदीतील एका पोस्टमध्ये गांधींनी दावा केला आहे की आज उत्तर प्रदेशातील प्रत्येक तिसरा तरुण “बेरोजगारीच्या समस्येने” ग्रस्त आहे.
या राज्यात दीड लाखाहून अधिक सरकारी पदे रिक्त आहेत,येथे पदवीधर, पदव्युत्तर पदवीधारक आणि पीएचडीधारक अत्यंत सामान्य नोकऱ्यांच्या रांगेत उभे आहेत. त्यामुळेच “डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना दुहेरी झटका!” आहे असे त्यांनी म्हटले आहे.
येथील बेरोजगारांना शासकीय नोकर भरतीची कोणती शाश्वतीची राहिलेली नाही. आणि भरती होत असतानाही पेपर फुटतो, पेपर झाला तर निकाल कळत नाही आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर निकाल आला तरी प्रत्यक्ष नोकरीत दाखल होण्यासाठी न्यायालयात जावे लागते, असे ते म्हणाले.
लष्कर ते रेल्वे आणि शिक्षक भरतीपासून पोलिस भरतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर लाखो विद्यार्थी ओव्हरएज झाले आहेत, असे ते म्हणाले.निराशेच्या या चक्रव्यूहात अडकलेला विद्यार्थी नैराश्याला बळी पडत आहे आणि तुटून पडत आहे, असे गांधी म्हणाले.
आणि या सगळ्यामुळे व्यथित होऊन जेव्हा तो आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला पोलिसांकडून लाठीमार होतो,” असा दावा त्यांनी केला. काँग्रेसची धोरणे तरुणांच्या स्वप्नांना न्याय देतील, त्यांची तपश्चर्या आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले.