बॉलीवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढा आपल्या आगामी “मॅडम चीफ मिनिस्टर’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. या चित्रपटामुळे ऋचा चड्डा काही काळापासून चर्चेत होती. त्यातच तिने बॉलीवूडमधील आणि बाहेरील यांच्याबाबत उल्लेख केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एका मुलाखतीत ऋचाने आपल्या खासगी आयुष्यापासून ते चित्रपट करियरशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. ऋचा म्हणाली, अनेक चित्रपटांमध्ये सिफारश केल्यामुळे अखेरच्यावेळी कलाकारांना रिप्लेस करण्यात येते. तसेच बॉलीवूडमध्ये बाहेरील व्यक्तीचा टिकाव लागणे खूपच कठीण होत आणि आजही तसेच आहे. याबाबत उदाहरण देताना ती म्हणाली, आज राजकुमार राव आणि अली फजल यासारख्या कलाकारांना पाहून आश्चर्य वाटते.
अलीने जेव्हा वेबसिरीज सुरू केली होती, तेव्हा अनेकांनी त्याला विरोध दर्शविला होता. परंतु आता त्याच्यासाठी सर्वांचे दरवाजे उघडले आहे. खर सांगायचे झाल्यास अली फजल आणि डिंपल कपाडिया यांसारखे कलाकार हॉलीवूड चित्रपटात काम करत आहेत. हे निश्चितच अभिमानास्पद आहे. दरम्यान, ऋचा चढ्ढाचा राजकीय ड्रामा असलेला “मॅडम चीफ मिनिस्टर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट अनेक कारणांमुळे वादात अडकला होता. याशिवाय ती लवकरच “अभी तो पार्टी शुरू हुई है’ आणि “लाहोर कॉन्फिटेंशियल’ चित्रपटात झळकणार आहे.