मुंबई: मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. यासोबतच कोल्हापुरातील “शिवाजी विद्यापीठासहित’ महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे “छत्रपती शिवाजी महाराज’ असे करण्याचीही मागणी केली आहे.
या संदर्भात भाजपचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. खासदार संभाजीराजे म्हणाले, आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मराठा आंदोलन करण्यात आले होते. त्यादरम्यान, त्यांच्याकडून काही चुका घडल्या असतील तर त्या समाजाच्या हितासाठी होत्या. त्यामुळे गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. ही मागणी मागच्या सरकारच्या वेळी सुद्धा केली होती. त्यांनीही काही गुन्हे मागे घेतले होते, पण सरसकट गुन्हे मागे घ्यावेत, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.