मुंबई – राज्यभरात परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे सर्वत्र नदी, नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मुंबई-ठाण्यासह सांगली, अहमदनगर, पुणे, बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, या जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान हवामान खात्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा “यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
परतीच्या पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस नई भाजीपाल्याचा समावेश आहे. यासोबतच द्राक्ष बागांनासुद्धा या परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.