– कडबा, आंबा, ज्वारी यांचे नुकसान
वीसगाव खोरे – भोर तालुक्यातील वीसगाव खो-यातील गोकवडी,पळसोशी,बाजारवाडी,निळकंठ, उत्रौली,कान्हवडी,खानापुर, भाबवडी,धावडी, या परीसरात गेले तीन दिवस पहाटे थंडी, दुपारी कडक उखाडा, साडेचार ते साडेपाचच्या सुमारास तासभर वादळी वारा,विजांच्या कडकडाट सह मुसळदार पाऊस पडत आहे.वादळी वाऱ्याने व गारांमुळे आंबा, फणस,शेवगा,काळी मैना( करवंदे ),जांभळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होत आहे.
विसगाव खो-यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचेही नुकसान झाले असून वादळी वारा व गारांच्या मा-याने डोंगरची काळी मैना( करवंदे ), जांभळे यांना आलेली फुले झडुन गेल्याने काळी मैना, जांभळे हा रानमेवा तसेच आंबा,फणस ही फळे जेथे गारांचा मार बसला आहे तेथे काळी पडतात त्याचा परीणाम या फळांची मागणी वर होतो.
वादळी वा-यांनी शेवगाची झाडे तुटून पडली आहेत. अवकाळीमुळे जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.शेतकरी पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या लहरीपणामुळे पिके भिजून नुकसान झाल्याने आर्थिक संकटात जाणार असल्याचे चित्र आहे. जनावरांचा चारा गवत,कडबा भिजल्याने नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत .
झाडे पडली, आंब्याचेही नुकसान
भोरच्या पश्चिम पट्ट्यात आज झालेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सुमारे पाऊण तास झालेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्र्यामुळे भोलावडे आणि महुडे खोऱ्र्यातील अनेक ठिकाणी झाडे पडली तर आंबा बागांचेही नुकसान झाल्यानेही शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सकाळपासून वातावरणात उकाडा होता तर हवेत ढगाळ बातावरण आणि ढगांचा गाडागडातही होत होता.अखेर ५.१५ वाजता जोरदार पावसाने तारांबळ उडवली.