वाघोली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे वाघोली मधील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी माजी उपसरपंच शांताराम कटके यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी संवाद साधत मागणी करण्यात आली.
शांताराम कटके यांनी सांगितले की, वाघोली येथील आय. व्ही. इस्टेट गृहप्रकल्पाकडे जाणारा रस्ता होणेबाबत, तसेच वाघोली मधील नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व पर्यायी जोड रस्ते होणेबाबत, भामा आसखेड प्रकल्प (योजना) चे पाणी वाघोली गावास लवकरात लवकर मिळणेबाबत उपमुख्यमंत्री पवार यांचेकडे मागणी करण्यात आली.
यावेळी अजित पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना केल्या असल्याचे कटके यांनी सांगितले.