कोपर्डे हवेली – चार दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे कोपर्डे हवेली, ता. कराड येथील पुईचा पूल कोसळला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता. गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देऊन पुलाची दुरुस्ती करण्याची विनंती केली. सह्याद्रीने निवेदनाची दखल घेत तातडीने पूलाचे काम सुरु केले.
या पूलावरुन पांढर शिवारास नडशी, वहागाव आदी गावांसाठी वाहतूक होत असते. सध्या सह्याद्रीच्या सहकार्याने पूलाचे काम सुरु असून पूल रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसापासून पूल ओलांडताना शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत थांबली आहे. रहदारीच्या दृष्टीने पूल महत्त्वाचा असल्यामुळे व तातडीने पूलाची दुरुस्ती सुरु केल्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोपर्डे हवेली गावातील शेतकऱ्यांचा शिवार पन्नास टक्के या पूलावर अवलंबून आहे. पूल कोसळल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती. सह्याद्री कारखान्याने तातडीने पुलाची दुरुस्ती केल्यामुळे रहदारीची समस्या दूर झाली आहे.
दिपक चव्हाण शेतकरी