Chandrakant Patil – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दृष्काळसदृष्य भागातील विद्यापीठांमध्ये फी माफीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी असे सांगितले की, विद्यापीठांकडून फी माफीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यापीठांना एक पत्रक काढून जुनमध्ये कोणाचीही 1 रुपया फी घेता कामा नये, असे आदेश देण्याचे आश्वासन दिले.
विक्रम काळे यांनी विद्यार्थ्यांच्या फी माफीच मुद्दा उपस्थित करताना म्हटले की, खासगी विद्यापीठ स्थापनेच्या बाबतीतील 2024चे विधेयक आहे. आपल्या राज्यात नवीन खासगी विद्यापीठ येत आहेत, याबद्दल आम्ही स्वागत करतो. परंतु जी काही नियमावली घालून दिली गेली आहे, त्या नियमावलीचं पालन होतं की नाही आणि विद्यार्थ्यांना त्याठिकाणी ठरवून दिलेली फी असतानाही भरमसाठ फी घेतली जाते.
यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मागच्या अधिवेशनात कोविडमध्ये आई किंवा वडील, किंवा दोघेही गेले तर अशा विद्यार्थ्यांची त्या वर्षाची नाही तर पूर्ण शिक्षण होईपर्यंत फी माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र विद्यापीठ अंमलबजावणी करत नव्हते, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी जॉईन बोर्ड ऑफ ईसीजी दर तीन महिन्यांनी कुलगुरुंची परिषद राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली कडक सूचना दिल्या. त्यानंतर प्रत्येक विद्यापीठाने पत्रक काढले. त्यामुळे सर्व विद्यापीठांना एक पत्रक काढून जुनमध्ये कोणाचीही 1 रुपया फी घेता कामा नये. पहिले परीक्षा फीचे केल्यानंतर संपूर्ण फी माफीचे करू, असे त्यांनी सांगितले.
सर्व मुलींना मोफत शिक्षण
जून 2024 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतिगृह मिळत नाही, त्यांना दरमहा 5 हजार 300 रुपये देण्यात येतील. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, राहाणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच मेडीकल, इंजिनीयरिंग सारख्या महागड्या शिक्षणासोबत एकूण 800 कोर्स मध्ये मुलींना मोफत शिक्षण मिळणार असल्याचे घोषणाही त्यांनी केली आहे.