संजय लीला भन्साळीचा आगामी सिनेमा “हिरामंडी’साठी रेखा आणि माधुरी दीक्षितशी संपर्क करण्यात आला आहे, अशी बातमी बऱ्याच दिवसांपासून ऐकायला मिळत होती. यावर संजय लीला भन्साळींनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
“हिरामंडी’मध्ये रेखा आणि माधुरी दीक्षित या दोघींना या सिनेमात निवडले जाणार नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे. यापूर्वी माधुरी दीक्षित आणि रेखाने एकत्र काम केले आहे. पण त्या दोघींची एकमेकांबरोबर एकही दृश्य नव्हते. या दोघींची निवड देखील एकमेकींबरोबर करण्यात आलेली नव्हती. या दोघींना एकमेकींबरोबर काम करण्याबाबत देखील विचारण्यात आलेले नव्हते.
ही निवड ओघानेच झालेली होती. पण “हिरामंडी’मध्ये या दोघींना एकत्र निवडण्याची काही गरजही नव्हती. एखाद्या सिनेमॅगझीनने “हिरामंडी’साठी स्वतःच एक कास्टिंग केले होते.
त्यामुळेच माधुरी आणि रेखा या दोघींना एकत्रितपणे ‘हिरामंडी’मध्ये कास्ट केले गेल्याची अफवा पसरली होती, असे संजय लीला भन्साळीने स्पष्ट केले आहे. ‘हिरामंडी’मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या दोघी लीड रोलमध्ये दिसणार आहेत.