प्राचार्य मारुती कदम ः “भैरवनाथ’मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
मांडवगण फराटा, दि. 23 (वार्ताहर) -शिरूर तालुक्यातील सर्व अधिकारी अफाट बुद्धीमत्ता, जिद्द व कार्यकर्तृत्वाच्या जोरावर, शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे यशस्वी झाले आहेत. भविष्यात याच विद्यालयातील अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जातील कारण खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागातच असते फक्त योग्य मार्गदर्शन व दिशा दिली पाहिजे, असे आवाहन प्राचार्य मारूती कदम यांनी केले.
आलेगाव पागा येथील श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. यावेळी प्राचार्य कदम प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिरूर नगरीचे प्रसिद्ध सोने – हिरे व्यापारी धरमचंद फुलफगर उपस्थित होते. शिरूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, दादासाहेब गवारी, प्रमोद काटे, हनुमंत शिवले, हेमंत दर्डा, प्रा. गोरक्षनाथ डुबे, प्रा. संतोष शेळके, उपप्राचार्य संभाजी कुटे, रविंद्र चौधरी, पांडूरंग वेताळ, अंबादास गावडे, देवीदास कंठाळे, दिलीप वाळके इ. मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुलांच्या पिण्याच्या पाण्यासाठी फुलफगर यांनी सुमारे एक लाख रुपये किमतीचा वॉटर फिल्टर विद्यालयास दिला. प्रमोद काटे यांनी बोअरवेलसाठी मोटर उपलब्ध करून दिली. रवीना वाघचौरे, पुजा गुंजाळ, तनुजा डुबे, आकांक्षा शितोळे, सुकन्या मोरे, मानसी आसवले, आकाश होल गुंडे, प्रथमेश वार घडे, राहुल भोसले, गायत्री रसाळ, सृष्टी कांबळे, अमृता रासकर, रेशमा पवार इ. मुलांनी शाळेप्रती व गुरूजनांप्रती असलेला आदर व जिव्हाळा मनोगतातून मांडला.