नवी दिल्ली – एकदिवसीय किंवा टी-20 क्रिकेटमध्ये सातत्याने सरस कामगिरी केलेल्या यजुवेंद्र चहलने आपण आता कसोटी क्रिकेटसाठीही सज्ज असल्याचे म्हटले आहे.
करोनाचा धोका असताना क्रिकेट ठप्प झाले होते त्या काळात मानसिकता निराशाजनक झाल्यामुळे पुढील काळात होत असलेल्या क्रिकेटचा विचारही कोणी करू शकत नव्हते. मात्र, मी याच काळात मानसिकरित्या सक्षम बनलो. क्रिकेटच्या तीनही प्रकारांत आपली कामगिरी सिद्ध झाली तरच एक परिपूर्ण क्रिकेटपटू म्हणून ओळख तयार होते. त्यामुळे आता चेंडूची ग्रीप व टप्पा आणि दिशा यांवर सध्या मेहनत घेण्याचे ठरवले आहे, असे चहल म्हणाला.