नगर – जिल्ह्यात करोनामुक्तीची आशा मावळत चालली असून, दररोज तीनशे ते चारशे करोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता नगरकरही चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्यात करोनाबधितांची वाटचाल सात हजारीकडे सुरु झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवार (दि.4) सायंकाळी सहा वाजेपासून आज रुग्णसंख्येत 470 ने वाढ झाली.
यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 610 इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 215 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता 4 हजार 580 इतकी झाली.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये आज 16 रुग्ण बाधित आढळून आले.
बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीरामपूर दोन, मनपा चार, मुकुंदनगर एक, भोसले आखाडा एक, सावेडी नाका एक, पद्मानगर एक, कॅन्टोन्मेंट तीन, राहुरी दोन, सोनगाव एक, राहुरी शहर एक, नगर ग्रामीण दोन, जेऊर दोन, कर्जत एक, श्रीगोंदा एक, नेवासे एक असे रुग्ण आढळले आहेत.
आज एकूण 315 रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा 123, संगमनेर 22, राहाता 10, पाथर्डी चार, नगर ग्रामीण 15, श्रीरामपूर 43, कॅन्टोन्मेंट एक, नेवासे 5, श्रीगोंदा तीन, पारनेर दोन, अकोले 11, राहुरी एक, शेवगाव एक, कोपरगाव एक, कर्जत तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.