नवी दिल्ली : ढासळलेल्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. आरबीआयने घातलेल्या बंदीमुळे या बँकांच्या खात्यातून पैसे काढणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने काही सहकारी बँकावर निर्बंध लादले आहेत. बँकांवरील ही बंदी सहा महिने कायम राहणार असल्याचे सांगितले जात असून याबाबत लवकरच निर्णय होणार आहे त्यामुळे या बँकांचे व्यवहार बंद असणार आहेत. तसेच या पाच बँकेचे ग्राहक स्वत:च्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. शिवाय, या बँका आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाहीत किंवा कर्ज घेऊ शकणार नाहीत. याशिवाय, कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकणार नाही. आरबीआयने बंदी घातलेल्या पाच पैकी तीन बँकांवर अंशत: ठेवी काढण्याची बंदी आणि इतर दोन बँकांवर पूर्ण बंदी घातली गेल्याचे सांगण्यात येत आहे.
रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेल्या पाच सहकारी बँकांमध्ये अकलूज-महाराष्ट्र, एचसीबीएल सहकारी बँक, लखनौ, आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद, शिमशा. सहकारी बँक नियामठा मद्दूर-कर्नाटक , उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा-आंध्र प्रदेश आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, या बँकांचा समावेश आहे.
आरबीआयने एका निवेदनात, या निर्बंधांचा आढावा घेण्यात येत आहे. या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊन हे निर्बंधही हटवण्यात येऊ शकतात, कारण बँकांचा परवाना अद्याप रद्द झालेला नाही. RBI ने ज्या पाच सहकारी बँकांवर निर्बंध लादले आहेत त्यापैकी एक महाराष्ट्रातील आहे.
या बँकांच्या व्यवहारांवर आरबीआयने मर्यादा घातली आहे. यानुसार शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज, महाराष्ट्र आणि उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, आंध्र प्रदेश या तीन बँकांमधून तुम्ही फक्त 5,000 रुपये काढू शकता. उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा, (आंध्र प्रदेश) आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज (महाराष्ट्र) या बँक ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवींमधून फक्त 5,000 रुपये काढू शकतात. याचा अर्थ, ग्राहकांच्या खात्यात कितीही रक्कम जमा केली असली तरी ग्राहकांना त्याच्या खात्यातून फक्त 5,000 रुपये काढता येतील.