मुंबई – IPL 2022 मध्ये विराट कोहलीची खराब कामगिरी कायम आहे. विराट बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. आयपीएल 2022 मध्येही त्याला आपल्या वाईट फॉर्मशी झगडाव लागत आहे. ना त्याच्या बॅटने टीम इंडियासाठी मोठी खेळी बघायला मिळत आहे, ना आयपीएलमध्ये यादरम्यान, संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कोहलीला खेळातून विश्रांती घेण्याचा सल्ला शास्त्री यांनी दिला आहे.
रवी शास्त्री म्हणाले, ‘खेळाडूबद्दल सहानुभूती ठेवायला हवी. प्रत्येकवेळी आग्रह धरून चालत नाही. निर्णय घेताना समजूदारपणा दाखवावा लागतो.’ ‘कोहली अत्यंत वाईट पद्धतीने सगळ्याला कंटाळला आहे. त्याला एक ब्रेकची आवश्यकता आहे. दीड ते दोन महिने असो किंवा कसाही पण त्याला एका ब्रेकची नितांत आवश्यकता आहे. कोहलीला आरामाची गरज आहे.’
विराटमध्ये अजून सहा-सात वर्षांचे क्रिकेट बाकी आहे आणि त्याच्यावर जास्त जोर न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल. भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोहलीला विश्रांती देण्यात यावी, सततच्या टीका आणि अपेक्षांच्या ओझ्याने तो थकला आहे. असेही शास्त्री म्हणाले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सर्वात मोठा फलंदाज विराट कोहली या आयपीएल 2022च्या मोसमात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. विराटने या आयपीएलमध्ये आतापर्यंत 7 सामन्यात 19.83 च्या सरासरीने केवळ 48 धावा केल्या आहेत.