नगर – एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले माजी खासदार दिलीप गांधी व शिवसेना उपनेते अनिल राठोड हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एकत्र आले असून त्यांचे मनोमिलन झाले आहे.
गांधी मैदानातील भाजप कार्यालयात आज दुपारी सेना भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. गेल्या दहा वर्षा पासून दिलीप गांधी व अनिल राठोड यांच्यात वयक्तीक वाद नसून पक्षात मतभेद होते.
गांधी यांनी राठोड यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे शहरातील प्रचारामध्येही सक्रीय नव्हते. त्यामुळे राठोड यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र गांधी, राठोड यांचे मनोमिलन झाल्याने शहरात प्रचाराला गती येणार आहे. गांधी म्हणाले की, कोणत्याही गोष्टीला योग्य वेळ लागते. व ती योग्य वेळ आज आली. त्यामुळे राठोड यांनी चिंता करण्याचे कारण नाही. आपन एकत्र आल्याने महायुतीचा विजय निश्चित आहे.