पुणे : गहुंजे येथील एमसीएच्या मैदानावर सुरू असलेल्या रणजी सामन्यात संकलेचा आणि खुराणा यांच्या प्रत्येकी ३ बळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने छत्तीसगडच्या संघास पहिल्या डावात २८६ धावांवर रोखून ३ धावांची आघाडी घेतली.
End Innings: Chhattisgarh – 286/10 in 110.6 overs (Sumit Ruikar 13 off 57, Onkar Verma 5 off 8) #MAHvCHH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 27, 2019
त्यानंतर महाराष्ट्राने दुस-या डावात फलंदाजी करताना तिस-या दिवसअखेर १ बाद ३९ धावा केल्या असून ४२ धावांची आघाडी घेतली आहे. ट्रकंवाला ९ धावांवर बाद झाला आहे. तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सत्यजित बच्छाव ०१ आणि ऋतुराज गायकवाड २८ धावांवर खेळत होता.
Stumps Day 3: Maharashtra – 39/1 in 12.6 overs (S S Bachhav 1 off 6, R D Gaikwad 28 off 42) #MAHvCHH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 27, 2019
तत्पूर्वी, महाराष्ट्राचा पहिला डाव २८९ वर आटोपला होता. प्रत्युत्तर देताना छत्तीसगडने दुस-या दिवसअखेर ३ बाद १३१ धावा केल्या होत्या. शुक्रवारीत हरप्रीत भाटिया, अमनदीप खरे, अजय मंडल, मनोज सिंग यांच्या फलंदाजीच्या जोरावर २८६ धावांपर्यत मजल मारली. भाटियाने ९०, खरेने ४०, मंडलने ३५ आणि मनोज सिंगने ३० धावांची खेळी केली.
महाराष्ट्राकडून खुराणाने ६४ धावांत ३, संकलेचाने ७० धावांत ३, मुकेश चौधरीने ८७ धावांत २ आणि सत्यजित बच्छावने ४२ धावांत १ गडी बाद केला.