नवी दिल्ली: शहरी भारतीयांपैकी जवळपास निम्मे बेरोजगारीबद्दल सर्वात जास्त चिंतेत आहेत. तर देश योग्य दिशेने चालला आहे, असे त्यापैकी 69 टक्के लोक विचार करतात, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि हिंसाचार, गरिबी आणि सामाजिक असमानता आणि वातावरण बदल हे विषयही भारतीयांना भेडसावत आहेत, असेही या सर्व्हेक्षणामध्ये आढळून आले आहे जगभरात कोणत्या चिंता भेडसावत आहेत ? असा विषय असलेल्या “आयपीसोस’ कंपनीच्या या सर्व्हेक्षणामध्ये भारतीयांनी बेरोजगारीला सर्वात चिंतेची समस्या मानले आहे.
जागतिक पातळीवर निराशेचे वातावरणाचा भारतावरही परिणाम होत असताना 69 टक्के शहरी भारतीयांना आपला देश योग्य मार्गावर असल्याचे वाटते आहे आणि 61 टक्के जागतिक नागरिकांना आपला देश चुकीच्या मार्गावर आहे असे वाटते, या सर्व्हेक्षणामध्ये भाग घेतलेल्यांपैकी किमान 46 टक्के शहरी भारतीयांनी बेरोजगारी किंवा रोजगारशून्यता ही चिंतेची बाब असल्याचे वाटते आहे. या सर्व्हेक्षणाची पूर्वी फेरी ऑक्टोबरमध्ये झाली होती. तेंव्हाच्या प्रमाणापेक्षा नोव्हेंबरमध्ये झालेल्या सर्व्हेक्षणात हे प्रमाण 3 टक्क्यांनी वाढले होते.
भारतीयांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांमध्ये आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि हिंसाचर, गरिबी आणि सामाजिक असामनता आणि वातावरण बदल हे असल्याचेही सर्व्हेक्षणात म्हटले आहे. दुसरीकडे गरिबी आणि सामाजिक असमानता या समस्या जागतिक नागरिकांना सर्वाधिक भेडसावत आहेत. त्यानंतर बेरोजगारी, गुन्हेगारी आणि हिंसाचार, भ्रष्टाचार आणि आरोग्याच्या समस्यांचा क्रम लागतो आहे. हे सर्व्हेक्षण दर महिन्याला जगभरात 28 देशांमध्ये ऑनलाईन पद्धतीने केले जाते.