नवी दिल्ली : रणजी करंडक स्पर्धेची चौथी फेरी आजपासून सुरु झाली आहे. या फेरीत महाराष्ट्र विरुद्ध सेनादल यांच्यात (सर्विसेस) दिल्ली येथे सामना होत आहे. या सामन्यात पी.एस.पूनियाच्या शानदार पाच बळीच्या जोरावर सेनादलाने महाराष्ट्राचा पहिल्या अवघ्या ४४ धावांवर खुर्दा उडवला. उर्वरित खेळात सेनादलाने ४ बाद १४१ धावा करत खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.
Stumps Day 1: Services – 141/4 in 50.6 overs (Ravi Chauhan 49 off 138, Rahul Singh Gahlaut 22 off 37) #SERvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 3, 2020
दिल्लीच्या पालम ए ग्राउंड येथील मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या अंगलट आला. सेनादलाच्या पूनियाने १०.२ षटकांत केवळ ११ धावांत ५ फलंदाज बाद करत महाराष्ट्राच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. त्यानंतर रजत पल्लीवालच्या ४२ आणि रवि चौहानच्या नाबाद ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर सेना दलाने पहिल्या डावात दिवसअखेर ९७ धावांची आघाडी मिळवली.
Maharashtra Won the Toss & elected to bat #SERvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 3, 2020
सेनादलाच्या गोलंदाजीपुढे महाराष्ट्राच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. महाराष्ट्राकडून सत्यजीत बछाव ११ आणि चिराग खूराना १४ यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. याव्यतिरिक्त महाराष्ट्राचे ८ खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले. नौशाद शेख व मुर्तझा ट्रंकवाला यांना तर भोपळाही फोडता आला नाही. तसेच मुकेश चौधरी शून्यावर नाबाद राहिला. सेनादलाकडून पूनियाने सर्वाधिक ५ तर सच्चिदानंद पांडेने ३ आणि दिवेश पठाणियाने २ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली.
End Innings: Maharashtra – 44/10 in 30.2 overs (C G Khurana 14 off 47, M G Choudhary 0 off 1) #SERvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 3, 2020
सेना दलाने नकुल वर्मा (०), ए सालवी (१६) आणि ए बामल (१०) यांना झटपट गमावले. त्यावेळी सेनादलाची ३ बाद ३६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रज्जत आणि रवी चौहान यांनी चौथ्या विकेटसाठी ६७ धावा जोडत संघाची धावसंख्या शंभरीपार नेली. रज्जत पलीवाल ४२ धावांवर बाद झाला. त्यानंतर रवी आणि राहुल सिंग डाव सावरत आणखी पडझड होऊ दिली नाही. महाराष्ट्राकडून संकलेचाने २ तर मुकेश चौधरी आणि इंगळेने प्रत्येकी १ गडी बाद केला. पहिल्या दिवसअखेर सेनादलाने ४ बाद १४१ अशी मजल मारली असून खेळ थांबला तेव्हा राहुलसिंग गहलोत २२ आणि रवी चौहान ४९ धावांवर खेळत होता.