गुडगाव – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र व विदर्भ यांच्यातील सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्यात महाराष्ट्राने कर्णधार अंकित बावणे व नौशाद शेख यांच्या फलंदाजीच्या जोरावर फॉलोऑनच्या नामुष्कीचा सामना केला मात्र, पराभव टाळण्यात यश मिळवले.
विदर्भने गणेश सतीशचे द्विशतक व अक्षय वाडकरचे शतक याच्या जोरावर 5 बाद 570 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर महाराष्ट्राची अवस्था 3 बाद 63 अशी बिकट केली होती. मात्र, त्याचवेळी नौशाद शेखने दमदार शतक तर बावणेने 92 धावांची खेळी केली परंतू त्यांना फॉलोऑन टाळता आला नाही.
महाराष्ट्राचा पहिला डाव 328 धावांवर संपला. दुसरा डाव सरु केल्यावर महाराष्ट्राची स्थिती 4 बाद 69 अशी बनली होती. मात्र, त्यानंतर अझीम काझीने 33 धावा करत बावणेसह विदर्भला आणखी यश मिळू दिले नाही व सामना अनिर्णित राखला.