नागरपूर : भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी सुवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर महाआघाडी तयार झालीच नसती. उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री झाले नसते.
असं वक्तव्य भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी आज नागपुरात केलं. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राज्यात महाआघाडी तयार झाली महाविकास आघाडी झाली.
या सरकारने शेतकरी, बेरोजगार विद्यार्थी, यांच्यासाठी कोणताही विचार केलेला नाही असे राणे म्हणाले. हे हिवाळी अधिवेशननसून एखादा घरगुती कार्यक्रम आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली.