‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर-साहनी यांच्यासह पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या एपिसोडमध्ये तिघांनाही ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
4 वर्षांपूर्वी म्हणजेच 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांनी कर्करोगाशी लढा देत जगाचा निरोप घेतला. कपिल शर्माच्या प्रीमियर एपिसोडमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तसेच ऋषी कपूर यांच्याबद्दल अनेक मनोरंजक किस्से शेअर केले.
वडील ऋषी कपूरबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला, ‘खरं तर ऋषी कपूर हे मूळ ट्रोल होते. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यापूर्वी पापा हे खरे ट्रोल होते. रात्री दोन ग्लास लिंबूपाणी पिऊन झाल्यावर ते पहिला कॉल आमच्या मावशीला करायचे. तिच्याशी तासभर बोलत राहायचे, आणि या बोलण्यादरम्यान ते तिला खूप ट्रोल करत असे. यावेळी मी, आई आणि रिद्धिमा फक्त त्याच्यासोबत बसायचो आणि त्याच्या बोलण्याचा आनंद घ्यायचो.’
रणबीर कपूर पुढे म्हणाला,’मी लहानपणी वडिलांना खूप घाबरत होतो, आपल्या आजूबाजूच्या लोकांपैकी कोणी काही चुकीचे केले तर त्याचा संयम सुटायचा. मग त्यांना बघूनच आम्ही घाबरायचो. मला आठवते मी लहान असताना. मला भाजी खायला अजिबात आवडत नसे. वडिलांनी एकदा माझ्याकडे बघितले आणि फक्त म्हणाले, भाजी काढू नकोस आणि मी खूप रडू लागलो. त्याच्या आवाजाने मला खूप भीती वाटायची.” असेही त्याने सांगितले
हे वाचले का ? ‘स्पिरिट’ चित्रपटात ‘प्रभास’सोबत दिसणार ‘कीर्ती सुरेश’