नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी, काँग्रेस नेत्या आणि तेलंगणा आणि केरळ प्रभारी, दीपा दासमुंसी यांनी केरळचा पदभार सांभाळला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्यासाठी केरळ हे एक महत्वाचे राज्य आहे. येथे भाजप आणि एलडीएफ विरूद्ध लढणे आव्हानात्मक आहे.
भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या की, भाजप फक्त हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन निवडणुका लढते आणि निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे इतर कोणतेही मुद्दे नसतात. बंगालमध्ये आजकाल भाजप घरोघरी जाऊन गीता मार्गाचे पठण करत आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनी काही संघटना स्थापन केल्या आहेत.
२०४० पर्यंत भारताला हिेंदुराष्ट्र बनवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. म्हणून ते राममंदिराचा मुद्दा हिंदी भाषिक राज्याच्या केंद्रस्थानी आणत आहेत. त्यातून प्रत्यक्षात ते उत्तर आणि दक्षिण राज्यांमध्ये फूट पाडत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. त्यांनी देशातील जनतेला एकजुट राहून भाजपला पराभूत करण्याच आवाहनही केले आहे. राम मंदिराचा मुद्दा केवळ भाजपचा नाही. या प्रकरणाचे सर्व श्रेय त्यांना देऊ नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसने माणिकराव ठाकरे यांच्या जागी तेलंगणाचे प्रभारी म्हणूनही दीपा दासमुन्शी यांना नेमले आहे