नवी दिल्ली : १९७१ च्या युद्धात अनुकरणीय शौर्य दाखवल्याबद्दल परमवीर चक्राने विभूषित कर्नल होशियार सिंह यांच्या पत्नीच्या पायांना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह स्पर्श केला. यावेळी त्यांनी जवानांच्या धाडसाचे कौतुकदेखील केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत विजय पर्व संकल्प समारंभात त्यांची भेट घेतली होती. आदरांजली म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी धन्नो देवी यांच्या चरणांना स्पर्श केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
१९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाच्या शेवटी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युद्धातील अनेक दिग्गजांना आणि युद्धातील शौर्य पदके प्राप्त करणार्यांपैकी काहींच्या कुटुंबियांची भेट घेतली. बांगलादेशातील ३० मुक्ति योद्ध्यांसह इतर दिग्गजांचे कुटुंबीयही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, १९७१ च्या भारतासोबतच्या युद्धात पाकिस्तानने आपले एक तृतीयांश सैन्य, निम्मे नौदल आणि एक चतुर्थांश हवाई दल गमावले आहे. जगाच्या इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा विजय होता. दिल्लीतील विजय पर्व संकल्प समारंभाला संबोधित करताना, राजनाथ सिंह यांनी १९७१च्या युद्धात ९३,००० पाकिस्तानी सैनिकांच्या आत्मसमर्पणाला जगाच्या इतिहासातील ऐतिहासिक आत्मसमर्पण म्हटले.
Defence Minister Rajnath Singh touched the feet of wife of Colonel Hoshiar Singh who was decorated with Param Vir Chakra for exhibiting exemplary courage in the 1971 war. The Defence Minister met her at Vijay Parv Samapan Samaroh in New Delhi today. pic.twitter.com/tjm9oakyKm
— ANI (@ANI) December 14, 2021
भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा दलांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना संरक्षण मंत्री म्हणाले की, “आपण आमच्या देशाच्या सीमांसह आमच्या एकता आणि अखंडतेचे रक्षक आहात. आज आपला देश निरंतर प्रगतीच्या मार्गावर पुढे जात आहे. देशात शांतता आहे. देश शांतपणे झोपतो कारण तुमच्यासारखे लोक जागे राहतात. देशासाठी तुमच्या बलिदानाची परतफेड होऊ शकत नाही.”
Had a warm interaction with the Bangladeshi Muktijoddhas and the Indian war veterans who fought against injustice in 1971 war.
The Indian Armed Forces worked together with the courageous Muktijoddhas in their valiant struggle.#SwarnimVijayParv pic.twitter.com/R6LnbUzeZC
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 14, 2021
राजनाथ सिंह यांनी ट्विटवर या कार्यक्रमाचे काही फोटोही शेअर केले आहेत. “१९७१ च्या युद्धात अन्यायाविरुद्ध लढलेल्या बांगलादेशी मुक्तियोद्ध्यांसोबत आणि भारतीय युद्धातील दिग्गजांशी प्रेमळ संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांनी त्यांच्या शूर लढ्यात धैर्यवान मुक्तियोद्ध्यांसोबत एकत्र काम केले,” असे सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
युद्धवीर कर्नल होशियार सिंग यांना १९७१च्या युद्धादरम्यान अनुकरणीय धैर्याचे प्रदर्शन केल्याबद्दल, परमवीर चक्र या देशातील सर्वोच्च लष्करी सन्मानाने सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे बांगलादेश मुक्त झाला, ज्याला तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखले जाते.