Rajasthan Assembly Election : निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणुकीची घोषणा केल्यानंतर राजस्थानचे राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा सूर बदलल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर त्यांचे सरकार पाडण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, मला जनतेचा पाठिंबा नसता तर माझे अर्धे आमदार मला सोडून गेले असते,” असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर आरोप करताना अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी,”अमित शहा, गजेंद्र शेखावत यांनी आमचे सरकार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यामुळे राजस्थान राजकीय चर्चेचा भाग होऊ शकले नाही, कदाचित त्यांना पीएम मोदींचा आशीर्वाद मिळाला असेल, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात सरकार पाडल्यानंतर इथलेही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला पण जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता.” असे त्यांनी (Ashok Gehlot) यावेळी म्हटले.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) म्हणाले, तिकीट देताना उमेदवाराची विजयाची क्षमताही पाहिली जाणार आहे, मात्र, स्थानिक पातळीवरील सार्वजनिक कामे विद्यमान आमदारांच्या माध्यमातूनच झाली आहेत, मग त्यांना तिकीट कसे नाकारता येईल? असे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीची काल दिल्लीत बैठक झाली तर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज पार पडणार आहे.
पुढे बोलताना त्यांनी, “आमदारांच्या मागणीवरूनच महागाई निवारण शिबिरे आणि महाविद्यालये सुरू करून रस्ते बांधले आहेत. आमदारांच्या मागणीवरूनच तहसील आणि नगरपालिका स्थापन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, परिसरातील जनतेशी आमदाराचे नाते आहे. गेहलोत म्हणाले की, राज्यातील काँग्रेस आमदार भ्रष्ट असल्याच्या अफवा भाजप आणि आरएसएसने पसरवल्या आहेत. ते म्हणाले, लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेसला सत्तेत आणावे लागेल,” असेही त्यांनी (Ashok Gehlot) यावेळी म्हटले.