Raj Thackeray । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एनडीएमध्ये सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तीन मोठे पक्ष (भाजप-एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट) असूनही मनसेला सोबत घेण्याची महाराष्ट्रात एनडीएला काय गरज आहे, असे अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. याची पाच मोठी कारणे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे.
पहिल कारण –
-लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि परिसरात उद्धव गट आणि काँग्रेस यांच्या युतीचे कितपत नुकसान होऊ शकते, हे भाजपला कुठेतरी स्पष्ट नाही, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
-गेल्यावेळी येथील सर्व जागा एनडीएने जिंकल्या होत्या. अशात भाजप यावेळीही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. पक्षासाठी हे आकडे फार महत्त्वाचे आहे. विशेषत: उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कोणतीही जागा जिंकल्यास त्यांच्या पक्षाला मोठी उभारी मिळेल. त्याचा मुकाबला करण्यासाठी अजूनही ताकदवान लोकांना आपल्या गोटात आणण्याची गरज आहे.
दुसरे कारण – ‘मुंबई आणि परिसरातील जागा जिंकण्याचा बेत’
-‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणात महाविकास आघाडी (इंडिया ब्लॉक) आणि एनडीए यांच्यात सुमारे 4 टक्के मतांचा फरक दिसून आला. याचा स्पष्ट अर्थ असा की सुमारे 15 टक्के फ्लोटिंग मते अजूनही दिसत होती. अशात फ्लोटिंग व्होट वेळेत आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
-या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. विशेषत: दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा सुरू आहे. त्याचा परिणाम मुंबई आणि परिसरात दिसून येत आहे.
तिसरे कारण – ‘मराठी मतदारांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न’
-भाजपला वाटते की शिवसेनेचा मूळ मराठी मतदार अजूनही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे आणि त्यांची एकनाथ शिंदेंसोबत भाजपमध्ये बदली होण्याची शक्यता कमी आहे. अशात राज ठाकरेंसारखा चेहरा एनडीएसोबत असेल तर किमान ती मते एकत्र आणण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो.
चौथे कारण – मनसेलाही महायुतीत सामील होणे मजबुरी
-दुसरीकडे राज ठाकरे यांचीही एनडीए आघाडीत सामील होणे ही मजबुरी आहे. त्यांच्या पक्षाचा आलेख हळूहळू खाली जात आहे. मनसेची एक ते दोन टक्के मते शिल्लक असल्याचे गेल्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले.
-२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजप आणि पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला होता. मात्र, 2019 मध्ये त्यांनी यू-टर्न घेत पंतप्रधान मोदींना विरोध केला. राज ठाकरेंच्या पक्षाने 2019 ची निवडणूकही लढवली नाही.
पाचवे कारण ‘हिंदुत्वाच्या रिकाम्या खेळपट्टीवर राज ठकारला संधी’
– उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये गेल्याने हिंदुत्वाची पिच रिकामी झाली असून भाजपच्या पाठिंब्याने संघटन मजबूत करण्याची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते, असे राज ठाकरेंना वाटते.
-राज ठाकरेंवरही त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दबाव आहे. अशात एनडीएमध्ये सामील होऊन राज ठाकरे पक्षाला तर वाचवू शकतीलच शिवाय लोकसभेतील त्यांची मतांची टक्केवारी आणि उपस्थितीही वाढवू शकतील.
‘राज ठाकरे फक्त भाजप हायकमांडच्या संपर्कात आहेत’
-विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे हे संभाषण भाजपच्या हायकमांडशीच होत आहे. यामध्ये शिंदे गट किंवा अजित गटाचा समावेश करण्यात आलेला नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, युतीची जी काही चर्चा होईल, ती भाजपसोबतच होईल. यामध्ये विधानसभेच्या जागांवर चर्चा होऊ शकते. सध्या महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची तयारी सुरू आहे.