Raj Thackeray On Manoj Jarange Patil । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित आज नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. । Raj Thackeray On Manoj Jarange Patil
नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं असून, तुफान फटके बाजी केली.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देखील भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, “जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मी गेलो होतो. मी त्यांना सरळ सांगितलं हे होणार नाही. होणार नाही याचा अर्थ होऊ नये असं नाहीए…
टेक्निकली हे होऊ शकत नाही. मागे एकदा ‘एक मराठा लाख मराठा’ मोर्चा निघाला होता. यावेळी सर्व आले… काय झालं पुढे ? महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना हीच विनंती आहे, यांच्या भुलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही, घडू शकत नाही त्याची आश्वासने ही लोक देत आहेत’ असे राज ठाकरे यांनी ठणकावले.
राष्ट्रवादी म्हणजे निवडून आलेल्या लोकांची मोळी । Raj Thackeray On Manoj Jarange Patil
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी,” भाजप 1952 मध्ये स्थापन झालेला पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष आला. परंतु राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही. ती निवडून आलेल्या लोकांची मोळी आहे. शरद पवार आजपर्यंत हेच करत आहे.
जे जे निवडून येतात त्यांना सोबत घेतात आणि सांगतात हा माझा पक्ष आहे. वेगळे झाले तरी निवडून येणारेच. खऱ्या अर्थाने कोणते पक्ष स्थापन झाले असेल तर त्यात जनसंघ, शिवसेना आणि मनसे यांचे नाव घ्यावे लागणार आहे. या पक्षामधील 99 टक्के लोकांचा राजकारणाशी कधीच संबंध नव्हता.