औरंगाबाद – औरंगाबादमध्ये स्थिती बिघडू नये म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले असल्याच्या बातम्या मंगळवारी प्रसृृत झाल्यानंतर तेथील पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी मात्र असे कोणते आदेश दिल्याचा इन्कार केला आहे.
औरंगाबादमध्ये जमावबंदी असल्याचे कोणतेही आदेश काढले नसल्याची माहिती गुप्ता यांनी दिली आहे. आदेशामध्ये मनसेने मशिदींवरील भोंगे काढण्यासंबंधी दिलेल्या इशाऱ्याचाही उल्लेख असल्याची बातमी अगोदर देण्यात आली होती. तथापी ही सगळी माहिती चुकीची असल्याचा खुलासा आयुक्तांनी केल्याचा दावा काही संकेतस्थळांवर देण्यात आलेल्या बातम्यांत करण्यात आला आहे.
ही चुकीची माहिची आहे. जमावबंदी संबंधी कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या, शस्त्रे बाळगणे यावर आम्ही लक्ष ठेवून असतो. ही एक सामान्य प्रक्रिया आहे.
वर्षभर असे आदेश काढले जातात. कोणत्याही सभेमुळे किंवा विशिष्ट कारणामुळे हे आदेश काढले जात नाहीत. हा एक नियमित आदेश आहे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र यामुळे राज ठाकरे यांच्या सभेबाबत उलट संभ्रमच निर्माण झाला आहे.