आंबेठाण -गेल्या चार दिवसांपासून महाळुंगे इंगळे आणि परिसरातील गावांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे सगळीकडे रस्ता चिखलमय झाल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असली तरी पावसामुळे सगळेच समाधानी झाले आहेत.
सतत पडणाऱ्या पावसाने भात उत्पादक शेतकरी आनंदित आहे कारण सतत पडणाऱ्या पावसाने भात रोपे तरारली आहेत. तर जमिनीतील पाण्याची पातळी सुद्धा वाढली आहे.