नवी दिल्ली – रेल्वेचे किंवा राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले.
रेल्वेचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा होती त्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी वरील बाब स्पष्ट केली. गोयल म्हणाले की, राजधानी-शताब्दीचे आणि रेल्वेचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. रेल्वेमध्ये लवकरच नऊ हजार पदांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.