Rahul Gandhi In Mumbai| काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. आज मुंबईतील शिवाजी पार्कवर राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मुंबईत सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ‘न्याय संकल्प’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेनंतर तेजपाल सभागृहात सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत.
विशेष म्हणजे या सभेला इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कोण -कोणते नेते सभेला राहणार उपस्थित? Rahul Gandhi In Mumbai|
या सभेद्वारे इंडिया आघाडीकडून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला.
त्याचबरोबर जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडिया आघाडीचे 15 हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
सभेपूर्वी राहुल गांधींची पदयात्रा होणार Rahul Gandhi In Mumbai|
14 जानेवारीपासून मणिपूरमधून सुरू झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज शेवटचा दिवस आहे. त्यांच्या यात्रेची आज मुंबईत सांगता होणार आहे. राहुल गांधी यांच्या सभेपूर्वी मुंबईत न्याय संकल्प पदयात्रा मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मुंबईच्या मार्गावर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु होणार आहे. या मोर्चात सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित लोक सहभागी होणार आहेत.
‘भारत जोडो न्याय यात्रे’विषयी जयराम रमेश यांनी दिली माहिती Rahul Gandhi In Mumbai|
‘भारत जोडो न्याय यात्रे’विषयी माहिती देताना काँग्रेसचे सरचिटणीस आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश म्हणाले की, “भारत जोडो न्याय यात्रेचा आज 63 वा आणि शेवटचा दिवस आहे. 14 जानेवारीला मणिपूर येथून सुरू झालेला 6,600 किमीचा ऐतिहासिक प्रवास आज संध्याकाळी मुंबईत पोहोचत आहे. या प्रवासात आम्ही 15 राज्यांतून, किमान 110 जिल्ह्यांतून गेलो आणि करोडो लोकांशी संपर्क साधला. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी 15 जाहीर सभा घेतल्या आणि 70 ठिकाणी जनतेला संबोधित केले.”
हेही वाचा :
“निवडणूक आयोग शांत महाराष्ट्र अशांत करायला निघालाय का?” प्रकाश आंबेडकरांचा सवाल