नवी दिल्ली – काँग्रेस पक्ष कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ च्या तयारीत व्यस्त आहे. काँग्रेसला या राज्यातील निवडणुकी खूप आशा आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.
यासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज कर्नाटकात सभा घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपचे सरकार ’40 टक्के आयोगाचे सरकार’ असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. सभेत बोलतांना राहुल गांधी पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे सर्व नेते एकत्र निवडणूक लढवतील आणि भाजपचा सफाया होईल,असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
या सभेला काँग्रेस कार्यकर्त्यासह सामान्य लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. बेळगावसह उत्तर कर्नाटकातून लोक सभेला उपस्थित होते. तसेच सभेसाठी व्यापक फलक आणि स्वागत कमानी उभारल्या होत्या. राहुल यांचे आगमन झाल्यानंतर ‘राहुल… राहुल…’अशा घोषणा कार्यकर्त्यांतून देण्यात येत होत्या.
या सभेत राहुल गांधींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. या घोषणांची चर्चा सध्या चर्चेत आली आहे.
– काँग्रेसचे सरकार आल्यानंतर प्रत्येक पदवीधर तरुणाला दोन वर्षांसाठी दरमहा तीन हजार रुपये दिले जाणार आहेत.
– डिप्लोमाधारक तरुणांना 2 वर्षांसाठी दरमहा 1500 रुपये दिले जातील.
– काँग्रेस सरकार पाच वर्षांत 10 लाख तरुणांना रोजगार देणार, अडीच लाख सरकारी पदे भरणार.
– महिला आणि गरीब कुटुंबांसाठीही आश्वासने देण्यात आली.
– काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे.