रांची : केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीराज सिंह यांनी बेताल वक्तव केले आहे. भारतात जे मुघल आणि ब्रिटिशांनी केलेले नाही ते काम राहुल गांधी करताय असा आरोप त्यानी केला.
रांचीच्या भाजपा कार्यालयात नागरिकता दुरुस्ती कायद्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जे लोक या देशातील आहेत त्यांना या कायद्याचा त्रास नाही, फक्त कॉंग्रेस आणि देशाचे टुकड़े टुकड़े करणाऱ्या टोळीला आहे.
ते म्हणाले, कॉंग्रेसने केलेले पाप धुण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्ष देशात संभ्रम पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. हा सर्व कॉंग्रेसच्या दुटप्पी धोरणाचा परिणाम आहे. कॉंग्रेस पक्षाने धर्माच्या आधारे देशाची फाळणी स्वीकारली, हिंदु, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, विभाजनाच्या पाकिस्तानात राहणाऱ्या अल्पसंख्यांकाचा सतत छळ केला जातो. महिलांवर बलात्कार केले जातात, जबरदस्तीने धर्मांतर करतात. त्यामुळे त्यांची लोकसंख्या 23 टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आली असल्याचा दावा त्यांनी केला.
गिरीराज सिंह म्हणाले की, या योजनांच्या अंमलबजावणीत धर्माच्या आधारे कोणताही भेदभाव केला गेला नाही, ‘सबका साथ सबका विकास’ हा आपला संकल्प आहे. “ओवेसीसारखे लोक भारतात अशांतता पसरवण्याचा कट रचत आहेत, ज्याला देशातील जनता कधीही माफ करणार नाही.” अशा लोकांना जनता योग्य उत्तर देतील. राहुल गांधींचं घुसखोरांवर एव्हढे प्रेम आहे तर त्यांनी अशा घुसखोरांना आता इटलीला घेऊन जावे असा टोलाही लगावला.